मुुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर जोरदार भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवत ते भोंगे खाली उतरावा अन्यथा त्याच्यासमोर हमुमान चालिसा वाजवण्यात येईल. असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुण्यात मुस्लिम समाज नाराज झाला असून अनेक मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी यावरून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
“शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमची नाही”; मनसेची राष्ट्रवादी, शिवसेनेवर जहरी टीका
सचिन खरात यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे. या राष्ट्रीय पुरुषांनी समाज जोडण्याचे काम केलं आहे. परंतु माननीय राज ठाकरे वारंवार हम करेसो कायदयाची भाषा बोलत आहे. संविधानातील कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, याची जाणीव राज ठाकरेंना करून देणं गरजेची आहे. त्यांच्या या बोलण्याने समाजातील एकीला तडा जाऊ शकतो. असं त्यांनी म्हटलं आहे.
“शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची ‘ढ’ टिम”; आदित्य ठाकरेंच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर
राज ठाकरे कोण वाईट आणि कोण चांगला सर्टिफिकेट देत आहेत. हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार राज ठाकरे यांना कोणी दिला, म्हणून राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारला करत आहे. असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे सचिन खरात यांनी केलेली मागणी राज्य सरकार मान्य करणार की नाही ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
देशाला राहुल गांधींची गरज; ७८ वर्षीय महिलेने केली राहुल गांधींच्या नावे संपत्ती
दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजीद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मजीद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.
महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे या राष्ट्रीय पुरुषांनी समाज जोडण्याचे काम केलं पण माननीय राज ठाकरे वारंवार हम करेसो कायदयाची भाषा बोलत आहे. संविधानातील कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही याची जाणीव राज
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) April 5, 2022
ठाकरेंना करून देणं गरजेची आहे त्यांच्या या बोलण्याने समाजातील एकीला तडा जाऊ शकतो. राज ठाकरे कोण वाईट आणि कोण चांगला सर्टिफिकेट देत आहेत हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार राज ठाकरे यांना कोणी दिला म्हणून राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) April 5, 2022
Read also:
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांना विरोध; पुण्यात वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
- कोल्हापूरात राजकीय आखाडा तापला; प्रचारासाठी मैदानात उतरली युवा नेत्यांची फौज
- “ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर मुस्लिम समाज नाराज! पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
- “जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य