मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त हिंदुत्वाच्या मुद्यावर जोरदार भाषण केलं. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमानचलीसा ऐकवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. सत्तेत असणाऱ्या शिवसेनवर देखील राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली होती. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला सी टीम म्हटलं आहे. त्यावर आता मनसेने प्रत्युत्तर दिलं आहे.
व्वा रं पठ्ठा…,काय बोलावं आता? अजित पवारांकडून खास दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे मनसेला सी टीम म्हणत असेल तर शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची ढ टिम आहे, असा खोचक टोला त्यांनी लावला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची एका वृत्त वाहिनीने मुलाखत आयोजित केली होती ज्यामध्ये त्यांनीही मनसेवर सडकून टीका केली आहे. एमआयएम भाजपची बी टीम होती हे तर सगळ्यांनाच माहित होतं मात्र आता मनसे भाजपची टीम झाल्याच्या आनंद मला होतं आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तब्येत बिघडली; व्हिलचेअरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल
भाजप आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील शिवसेनेची जागा व्यापण्याचा प्रयत्न करत आहे का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांना विचारल्यानंतर त्यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे. जनतेला दिलेली वचने निवडणूक काळानंतर पूर्ण करणे, आणि जनतेची सेवा करणे हे आमचे हिंदुत्व आहे. भाजप आपल्या सोयीनुसार सत्तेच्या लालसेपोटी इतर पक्षांना वापरून घेतो. . प्रक्षोभक बोलून, हिंदू-मुस्लीम दंगे करून तसेच वाद घडवून सत्ता मिळवणे याला भाजप आपला मास्टरप्लॅन समजतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी गुढीपाडव्याला याच नीतीचा वापर करून आपले मनसुबे जाहीर केले आहेत असा टोलाही आदित्य ठाकरेंनी मनसेला मारला आहे.
“मोदींमुळे देशात हिंदुत्वाची लाट; राज ठाकरेंचं आम्ही स्वागत करू”; भाजप नेत्याचं वक्तव्य
मनसेसारखा पक्ष हा इतक्या वर्षांमध्ये आपली भूमिका स्प्ष्ट करू शकलेला नाही. त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे हे आम्हाला चांगले माहित आहे. राज्यातील जनतेनीही हे लक्ष ठेवावं की कोणाच्या तरी बोलण्यावरून वाद-विवाद वाढू नयेत.शिवसेना अयोध्येत गेल्यानंतर आता तो प्रश्नही मिटला आहे त्यामुळे ते कधीही अयोध्येला जाऊ शकतात असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना मारला आहे.
Read also:
- देशाला राहुल गांधींची गरज; ७८ वर्षीय महिलेने केली राहुल गांधींच्या नावे संपत्ती
- वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
- काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
- विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट
- “काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली”; राज ठाकरेंच्या भाषणांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया