मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना व्हिलचेअरवरून जे.जे. रुग्णालयात नेले असून त्यांच्या वर त्याठिकाणी शस्त्रक्रिया होणार आहे. १०० कोटी रूपये वसुली प्रकरणी आणि मनी लॉंड्रीग आरोपांखाली त्यांना इडीने अटक केली आहे. तर अलिकडेच त्यांचा मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत सध्या वाढ झाली आहे.
ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य; अजित पवार
अनिल देशमुख यांना २ एप्रिल रोजी सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. तसेच अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला प्रत्येक महिन्याला १०० कोटी रूपयांचं वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं असं खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला होता.
साहेबांच्या वारसदारांना संधी मिळाली पण..; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
परमबीर सिंहाच्या लेटरबॉम्बनंतर निलंबित एटीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. तसेच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांनीही या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना देखील भ्रष्टाचार केल्याप्रकरणी इडीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघाले आहे.
Read also:
- “मोदींमुळे देशात हिंदुत्वाची लाट; राज ठाकरेंचं आम्ही स्वागत करू”; भाजप नेत्याचं वक्तव्य
- राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तो पर्यंत युती शक्य नाही; रावसाहेब दानवे
- भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
- पोलिसांनी दरेकरांविरोधात कारवाईचा फास आवळला; ‘बोगस मजूर’ प्रकरण भोवणार
- धनंजय तू बीडमध्ये मेळावा लाव मी येतो; मुलांच्या हातात कोयत्याऐवजी वही-पुस्तक देऊ; मुख्यमंत्री