पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या जाहीर भाषणात सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काॅंग्रेस ते उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर फटकेबाजी करत हिंदुत्तवाच्या मुद्दयावर जोरदार भाषण केलं. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंगे नाही तर त्याच्यापेक्षा दुप्पट हनुमान चालिसा ऐकवण्यास येईल असा इशारा देखील दिला. त्यामुळे त्यांच्यावर आता सगळीकडून टीका केली जात आहे. याचाच धागा पकडत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
ज्याप्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. त्याप्रमाणे राज ठाकरे हे त्या तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशाच्या मुद्यावर लोकांना ठोकलंच. त्यानंतर हम सब भाई है म्हणत त्यांनी हाताला काहीच लागत नसल्याने त्यांनी हिंदुत्वाकडे टर्न केला. त्यानंतर त्यांना चमत्कार झाला आणि नरेंद्र मोदींच्या गुजरातला गेले. आता मोदी साहेबांवरकडून त्यांनी आपली मोर्चा बारामतीत नेत शरद पवारांची मुलाखत घेतली होती. आता त्यांना शरद पवार वाईट झालेत. असंही ते म्हणालेत.
मनसे भाजपची ‘सी’ टीम झाल्याचा आम्हाला आनंद; आदित्य ठाकरेंची मनसेवर खोचक टीका
राज ठाकरे यांचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम आहे. कोणत्याच ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, तसेच हिवाळ्यात थंडी वाजत नाही. असा टोला लगावत ते पुढे म्हणाले की, मूळ त्यांनाच धागा मिळत नाही. मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो म्हणून ही त्यांची ध़डपड आहे. तसेच राज ठाकरे यांनी मी लहानपणापासून ओळखत आहे. ते जेव्हा हाफचड्डीपासून मी शिवसैनिक आहे तेव्हा पासून ते आमच्या जिल्ह्यात येत होते. चंचल माणूस, चंचल स्वभावामुळे या गोष्टी असताता असंही ते म्हणालेत.
वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे. यावरून हनुमान चालीसा लावायला कोणाची मनाई आहे. भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप बाळासाहेब ठाकरे होत. त्या काळात कोणत्याही माईच्या लालची हिंमत होती नव्हती. पहिला पिच्चर काढला आता हा पिच्चर टू आहे. बोलणं सोप्प आहे करणं कठिण आहे. त्याचबरोबर मला जास्त बोलायला लावू नका, त्यांना जितकी मी ओळखतो तितक तुम्ही ओळखत नाही. नितीन गडकरींच्या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, भेट घेतली पाहिजे, त्यांच्या नावात ठाकरे आहे, काही तरी आरोप करायचे म्हणून करतात. ज्या माणसाला स्वतःचा एक नगरसेवक राखता येत नाही त्याच्या बद्दल काय बोलायचं. असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read also:
- पोलिसांनी दरेकरांविरोधात कारवाईचा फास आवळला; ‘बोगस मजूर’ प्रकरण भोवणार
- धनंजय तू बीडमध्ये मेळावा लाव मी येतो; मुलांच्या हातात कोयत्याऐवजी वही-पुस्तक देऊ; मुख्यमंत्री
- ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य; अजित पवार
- साहेबांच्या वारसदारांना संधी मिळाली पण..; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
- ” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा