मुंबई : गेल्या काही दिवसात कम झालेले इंधनाचा दर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. यावरून आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आल आहे.
आपल्या देशात निवडणुकांसाठी काहीही करण्याची सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांची तयारी असते. म्हणजे करोनासारख्या जीवघेण्या महामारीचा भयंकर तडाखा बसणार हे माहिती असूनही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडविला जातो. टाळता येणारा कुंभमेळय़ाचा उत्सव केला जातो. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षभरात कधीही कमी न झालेले पेट्रोल-डिझेलचे दरदेखील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक घसरतात, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, सामान्य माणसाच्या खिशाचे काय? तो तसाही रिकामाच आहे. पण ज्यांच्या खिशात किडुकमिडुक आहे, तेदेखील केंद्राला इंधन दरवाढीच्या रूपात काढून घ्यायचे आहे काय? आधी नोटाबंदी, नंतर जीएसटी आणि मागील सवा वर्षापासून कोरोना-लॉक डाऊन यामुळे सर्वसामान्य जनतेची नोकरी, रोजगार, पगार असेही काढून घेतले गेलेच आहेत. आता ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का?, असा सवाल करण्यात आला आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आधी इंधन दरकपातीचा ‘चमत्कार’ आणि निवडणुकीनंतर दरवाढीचा ‘नमस्कार’ जनतेला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. हा चमत्कार-नमस्कार म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकीसाठीची जुमलेबाजी होती, हे केंद्र सरकार स्वतःच सिद्ध करीत आहे. निवडणूक आली की, दरकपातीची मखलाशी करायची आणि निवडणूक संपली की, दरवाढीचा वरवंटा फिरवायचा, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- ‘ठाकरे सरकारचा अनलॉकबाबत ठोस ‘एक्झिट प्लॅन’ काय?’
- ‘स्वतःच्या कौतुकाची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचे न्यायालयानेच वाभाडे काढले’
- ‘पटोले हे विनोदी कलावंत, त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही’
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बदलीला ब्रेक, मॅटकडून स्थगिती
- ‘मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा’