मुंबई : सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचा विषय मांडला आहे. आता यापुढे देशातील सर्व राज्यातील पोलिसांचा एकच गणवेश असणार असल्याचा मोदींनी म्हटलं आहे. तसेच हा केवळ चिंतनासाठी ठेवलेला विषय असून कोणत्याही राज्यांवर हा निर्णय लादलेला नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यावर आता काॅंग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. राज्यांना कमकुवत करून केंद्र सरकार आपली ताकद अजून मजबूत करीत असल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे.
“सध्याच्या घडीला नारायण राणेंची किंमत चार आण्याची आहे”
तरूणांची मने अतिरेकी आणि विघातक गोष्टींकडे वळवणाऱ्या शक्तींचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यामुळे देशातील पोलिसांना एकाच प्रकारचा गणवेश असेल तर त्याची मागणी वाढेल आणि अधिक चांगल्या दर्जाचे गणवेश तयार होऊ शकतील. शिवाय देशभरात कुठेही लोक पोलिसांना गणवेशावरून ओळखू शकतील. राज्ये त्यावर आपापल्या दलांची चिन्हे लावू शकतील. असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
“..तर एक दिवस शिंदे सरकार मुंबईलाही गुजरातला देऊन टाकतील”
त्यावर आता काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकावर प्रखर शब्दात टिका केली आहे. राज्यांचे पोलिस दल त्या राज्याची ओळख असते. ती ओळख पुसण्याची कल्पना संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे. राज्यांना कमकुवत करून केंद्र ताकदवार होणे, देशाला एकाच रंगात रंगवणे विविधता शक्ती असलेल्या देशातील लोकशाही व संविधान दोघांसाठी घातक असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.
“आपले मुख्यमंत्री दहीहंडी, मंडळ, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीच करत नाहीत”
कायदा सुव्यवस्था हा संविधानातील राज्य सुचीतील विषय म्हणजेच प्रामुख्याने राज्यांची जबाबदारी आहे. आज केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवत आहे. हेही संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे. असं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काॅंग्रेससह देशातली इतर प्रादेशिक पक्षांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या या विषयावर आक्षेप नोंदवला आहे.
Read also
- “केंद्रातील लाड पुरवता पुरवता भाजप महाराष्ट्राला भिकेला लावणार”
- “खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार
- अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे
- “राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”
- “मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका