मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीच्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप केले आहे. तसेच मी आता पर्यंत आयकर विभाग आणि इडीला 50 भ्रष्टारा व्यक्तींची नावे दिली असल्याचे देखील सांगितले आहे. त्याचसोबत भाजपनेते किरीट सोमय्यांनी केंद्रीय मंत्र्याविरोधात पुरावे देखील दिल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणा त्या मंत्र्यांच्या घरावर धाडी का टाकत नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
सध्या आयकर विभागाची भानामती सुरू आहे. मुंबईत धाडी टाकण्याचं सत्र सुरू आहे. आम्ही देखील धाडी टाकण्याचा विचार करत आहे. तसेच पालिका निवडणुकांपर्यंत या धाडी अशाच सुरू राहतील, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर ईडीचे वरिष्ठ नेते जितेंद्र नवलानी यांच्यावर खळबळजनक आरोप लावले आहेत. 2017 साली ईडीनं दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी जितेंद्र नवलानीच्या खात्यात 25 कोटी रूपये ट्रान्सफर झाले. त्यानंतर ते पैसे 31 मार्च 2020 पर्यंत राकेश वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले आणि यांसंदर्भात अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग जितेंद्र नवलानी यांना भोसलेंकडून 10 कोटी दिले. त्यानंतर नवलानीच्या सात कंपनीकडून कोट्यावधी रूपये ट्रान्सफर केले गेले. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?
भाजपनेते किरीट सोमय्या हे इडीचे वसुली एंजंट बनले आहेत. तसेच इडी आणि इडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशिन बनली आहे. त्यांना इडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकिट देण्यात आली आहे. यासंदर्भात मी दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
तसेच किरीट सोमय्यांवर टीका करताना ते म्हणाले की, महान महात्मा किरीट सोमय्या सर्वांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात. तसेच सोमय्यांचे वाधवानसोबत आर्थिक संबंध काय ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत यांची अगोदर देखील शिवसेना भवनात पत्रकार परिषद पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळे या पत्रकार परिषद नंतर किरीट सोमय्या आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार. त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा