सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईवरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेच्या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यानंतर आमदार नितेश राणे यांनीही सरनाईकांवर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं. ईडीचा तपास अजून खोलवर झाला तर बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचं काही झालं असेल म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेवर जोरदार प्रहार केलाय. “ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं विद्यापीठ आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे शहर आणि जिल्ह्यात चालतात. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत”, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
Read Also :
..म्हणून विश्रांतीसाठी सोनिया आणि राहुल गांधी ‘या’ शहरात दाखल
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात ‘टास्क फोर्स’ची स्थापना
मुंबई महापालिका निवडणूक: भाजप मनसेसोबत जाणार? फडणवीस म्हणाले….
किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईचं स्वागत करत साधला शिवसेनेवर निशाणा, म्हणाले…