मुंबई : दिल्लीची हवा मानवत नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. राहुल गांधीही त्यांच्यासोबत गोव्यात आले आहेत. साधारण एक आठवडा मायलेक गोव्यात राहतील, असे सांगितले जात आहे.
बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस पक्षातही सध्या विरोधाचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसकडून काही पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, आता सोनिया गांधी आणि राहुल गांधीच दिल्लीत नसल्याने ही प्रक्रिया लांबवणीवर पडली आहे.
काँग्रेस पक्ष हा आता जवळपास संपला आहे. यानंतरही काँग्रेसला अजूनही हॉलिडे मूडमध्येच राहायचे असेल तर कल्याण आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. दोन निवडणुकांमध्ये आम्ही काँग्रेसला वाचवले होते. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करायला तयार होती. मात्र, त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही युती प्रत्यक्षात येऊ शकली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
ते मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. 2019 च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ‘वंचित’ने त्यांच्याशी युती केली नाही. आम्ही केवळ हरलेल्या जागा मागितल्या होत्या, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
Read Also :
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात ‘टास्क फोर्स’ची स्थापना
मुंबई महापालिका निवडणूक: भाजप मनसेसोबत जाणार? फडणवीस म्हणाले….
किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईचं स्वागत करत साधला शिवसेनेवर निशाणा, म्हणाले…