पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्तव वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्ह एकदा पेटण्याची शक्यता आहे. दोन वेळा मराठा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प बसला होता, अन् आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे. असं वक्तव्य त्यांनी अमरावतीमध्ये केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोसायट्यांमध्ये स्वच्छतेला चालना देण्यासाठी ‘ नमो करंडक ‘ स्पर्धेचे आयोजन
मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे असं म्हणणाऱ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंतचा जाहीर निषेध. आरक्षण मागणे म्हणजे खाज आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता आणि संपत्तीचा माज असणाऱ्या तानाजी सावंत यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा तानाजी सावंत यांचं रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“सीतारमण यांची बारामतीत घराणेशाहीवर टिका, राष्ट्रवादीने भाजपची यादीच दिली”
तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने देखील तानाजी सावंत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तानाजी सावंत यांनी मराठ्यांनी ओबीसी आरक्षण बाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिकेसोबत येणे शक्य नसेल. तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चोचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.
“शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत”; मुख्यमंत्रीही संतापले
दरम्यान, आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. अशी मागणी होत आहे. याचा कर्ता करविता कोण आहे. हे तुम्हा, आम्हाला समजणे गरजेचे आहे. याबाबत सगळ्यांना माहिती आहे. दोन वेळा मराठा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प बसला होता, अन् आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे. असं तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.
Read also
- “संजय शिरसाट यांची गुवाहाटी तर कडूंची सुरत जिल्ह्याच्या…;” राष्ट्रवादीने डिवचलं
- “अन्यथा शिवसैनिक शांत बसणार नाहीत”; शिवसेनेचा शिंदे सरकारला कडक इशारा
- “महाराष्ट्रातील जनता आता उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेत नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
- “आमच्या नेत्यांवर शितोंडे उडवाल तर नागडा करून मारू;” तानाजी सांवतांचा बीडमध्ये हल्लाबोल
- “तर तुमचा धर्म घ्या अन् पाकिस्तानात चालते व्हा”; राज ठाकरेंचा इशारा