मुंबई : बऱ्याच दिवसापासून राज्यात शिवसेनेमधील अतंर्गत वादामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या वादामध्ये आता भाजपने देखील उडी घेतली असून भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा उल्लेख आयटम गर्ल म्हणून केला आहे. त्यावर आता भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचे नेते त्यांच्यावर कडाडून टिका करताना दिसत आहे. यातच शिवसेना आणि नारायण कुटुंबीयांतील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम सॉंग असतं. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरेंचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत. असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला. त्यावर भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
आमच्या सर्व सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजप बिथरली आहे. स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की आपला पालापोचाळा होईल या भीतीने प्रत्येक ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद कऱण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रसाद लाड हे भाजपचे नेते असल्याने त्यांनी काहीही बोललेलं चालतं. आम्ही भाषण केलं की फक्त आम्हाला साधन सुची सांगायची किंवा संस्कृती सांगण्याची भाजपची ही पद्धत आहे. त्यामुळे जे प्रसाद लाड सेना भवन तोडण्याची भाषा करतात ते प्रसाद लाड भजापचे नेते असल्यामुळे त्यांना सगळं माफ आहे. अशी खरमरीत टिका देखील भास्कर जाधव यांनी केली.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावर भाजप अजून किती काळ सत्ता भोगणार?
दरम्यान, प्रबोधन सभेत भाजप आणि शिंदेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. यातच मुंबईतील माजी नगरसेवकांना शिंदे गटात येण्याची धमकी दिली जात आहे. जर आले नाहीत तर तडीपार करण्यात येईल असं देखील म्हटलं जात आहे. यावरून शिवसेना आणि भाजप व शिंदे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालं आहे.
Read also
- “राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं”; शिंदे, फडणवीस अन् ठाकरे भेटीवर भाजपची प्रतिक्रिया
- नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाला ब्रेक..! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले, “इतके दिवस मग काय…;”
- “शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”
- चंद्रकांत पाटलांची भूमिका म्हणजे भाजपाला घरचा आहेर : चेतन बेंद्रे
- “ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय ही शिंदे सरकारने बदलला”;