पुणे : शिवाजी पार्क येथील मैदानावर मनसे तर्फे दिपोत्सवाचं कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चेंना तोंड फुटलं. त्यावर कालच्या भेटीकडे राजकारण म्हणून पाहण्याची काहीही गरज नाही. अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.
“मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
राजकारणाबाबत काहीही होऊ शकतं. तर मनसेच्या युती संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही ते म्हणाले. दिवाळी आमचं सर्वात मोठं सण आहे. त्यासाठी तिन्ही नेते एकत्रित आले होते आणि त्याठिकाणी मोठा असा सुंदर असा कार्यक्रम झाला. राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं. तसेच एकनाथ शिंदे यांची सेना असेल किंवा आमचा भाजप पक्ष हा एकाच विचाराचा, एकाच मताचे आहेत. त्यामुळे त्यात काही गैर काहीही नाही. राजकारणात केव्हीही काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया देखील गिरीश महाजन यांनी दिली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावर भाजप अजून किती काळ सत्ता भोगणार?
आगामी महापालिका तसेच विधानसभेच्या सर्व निवडणुका एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. यातच राज ठाकरे यांच्या अलिकडेच भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. यामध्ये भाजपसोबत मनसे देखील एकत्रित निवडणुका लढणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यावर मनसेकडून अद्यापही दुजोरा देण्यात आला नाही.
Read also
- नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाला ब्रेक..! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले, “इतके दिवस मग काय…;”
- “शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”
- चंद्रकांत पाटलांची भूमिका म्हणजे भाजपाला घरचा आहेर : चेतन बेंद्रे
- “ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय ही शिंदे सरकारने बदलला”;
- “मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार