मुंबई : प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले असले तरी त्यांनी अद्यापही महाविकास आघाडीमध्ये गेल्याचं स्पष्ट केलेलं नाही. तसेच कुणीही कोणासोबतही गेले तरी आम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् मुख्यमंत्री मिळून आमची तिघांची ताकद महाराष्ट्र फार मोठी आहे. यामुळे आमची तीन राज्यात सरकार स्थापन झालं आहे. तसेच देशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आमचं सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..अब क्या होगा तेरा ‘अनिल परब’ ? किरीट सोमय्यांचं सुचक ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम दमदार होत आहे. यातच आता नागालॅंडमध्ये शरद पवार यांच्या पक्षाने मोदींना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदींना शरद पवार यांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी आपला निर्णय बदलावं आणि त्यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं. असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“तुम्ही शेतकऱ्यांची जात विचारताहेत”? अन् सभागृहात नाना पटोले सरकारवर भडकले
दरम्यान, मागील काही दिवसात झालेल्या ईशान्यकडील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलचं यश मिळालं आहे. नागालॅंडमध्ये भाजपला राष्ट्रवादीने आपला पाठिंबा जाहीर करून दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी शरद पवार यांना एनडीए मध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
Read also
- हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”
- हेही वाचा…नाना पटोलेंना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? काय म्हणाले शिवाजीराव मोघे ?
- हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
- हेही वाचा..शेतकरी हीच आमची जात, जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
- हेही वाचा..“आपल्या अन्नामध्ये कांद्याचा खर्च किती? हा प्रश्न संसदेत मांडणार”, शरद पवार