मुंबई : कोणत्याही देशाचा अथवा राज्याचा अर्थसंकल्प हा चांगलाच असतो. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसते. अंमलबजावणी झाली तर बजेठ हा सामान्य माणसांना दिलासा देणारा राहिल. परंतु आताच्या सरकारमधील अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेठमध्ये काही मुद्दे सुटले आहेत. अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
हेही वाचा…“तुम्ही शेतकऱ्यांची जात विचारताहेत”? अन् सभागृहात नाना पटोले सरकारवर भडकले
आताच्या अर्थसंकल्पात प्रकल्पग्रस्तांसाठी काही नाही, त्याचबरोबर शेतमजूर, घरकाम करणाऱ्या लोकांसाठी या बजेठ मध्ये काहीच ठोस पावलं उचलली गेली नाहीत. दिव्यांगासाठी घरांचा प्रश्न आहे. याची उत्तर आम्ही निश्चितपणे सरकारकडून घेणार आहोत. बच्चू कडू हा सामान्यांचाच असून बाप मेल्यांचं दु:ख नाही पण नेता मेल्यांच जास्त दु: ख राज्यातील लोकांना होतं. त्यामुळे आता नेत्याचे आम्ही खुप चाहते झालो आहोत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“तर 2024 ची निवडणुक देशातील शेवटची लोकशाही निवडणुक होईल”, आदित्य ठाकरेंचं सुचकं विधान
उद्या जर बच्चू कडू जरी गेला, नेता जरी गेला. तरी आपल्या मायबापावर निष्ठा ठेवा. हल्ली सामान्य माणुस प्रत्येक गोष्टीत नेता बघायला लागला आहे. अन् तिथेच आपली खरी फसगत होत आहे. त्याचबरोब उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत का गेले याचा उत्तर अजून दिलं नाही. तसेच ते अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी काय केलं? असा सवालही बच्चू कडू यांनी केला.
हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
दरम्यान, तुम्ही विचारासोबत गद्दारी केली, आम्ही सामान्य माणसांसोबत गद्दारी करू अस नाही. त्यामुळे आम्ही गद्दार नाहीत. तसेच आमची स्वत: ची पानटपरी आहे. त्यामुळे आम्हाला राज्यातील कोणत्याच पक्षाने निवडून दिलं नाहीत. तसेच बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सामान्यांशी नाही. असंही त्यांनी ठणकावून सांगितले.
Read also
- हेही वाचा…नाना पटोलेंना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? काय म्हणाले शिवाजीराव मोघे ?
- हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
- हेही वाचा..शेतकरी हीच आमची जात, जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
- हेही वाचा..“आपल्या अन्नामध्ये कांद्याचा खर्च किती? हा प्रश्न संसदेत मांडणार”, शरद पवार
- हेही वाचा..अब क्या होगा तेरा ‘अनिल परब’ ? किरीट सोमय्यांचं सुचक ट्विट