मुंबई : अलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत काॅंग्रेसमध्ये अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. नाशिक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून मोठा गोंधळ बघायला मिळाला होता. त्यावर काॅंग्रेसचे विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात हे देखील नाराज झाले होते. त्यानंतर काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवरून राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.
हेही वाचा…“तर 2024 ची निवडणुक देशातील शेवटची लोकशाही निवडणुक होईल”, आदित्य ठाकरेंचं सुचकं विधान
पदवीधर शिक्षक निवडणुकीच्या वेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सत्यजीत तांबे यांच्यात वाद झाला. त्यानंतर राज्यात काॅंग्रेसचे दोन गट पडलेत. त्यातील एका गटाने थेट काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. काॅंग्रेसची एक रचना आहे. त्या रचनेनुसार काही बदल केले जातात. तसेच नाना पटोले यांना काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावं असं काही दिसत नाही. असं माजी मंत्री आणि विदर्भातील काॅंग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांनी म्हटलं.
हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
दरम्यान, आदिवासी काॅंग्रेसमधील सर्व नेत्यांची बैठक येत्या १८ तारखेला बोलवली आहे. तसेच आदिवासी लोकांवर होत असलेल्या अन्यायावर चर्चा करणार आहोत. तसेच १४ एप्रिल रोजी किंवा त्या अगोदर राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत घेण्याचं ठरवलं असल्याचंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
- हेही वाचा..शेतकरी हीच आमची जात, जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
- हेही वाचा..“आपल्या अन्नामध्ये कांद्याचा खर्च किती? हा प्रश्न संसदेत मांडणार”, शरद पवार
- हेही वाचा..अब क्या होगा तेरा ‘अनिल परब’ ? किरीट सोमय्यांचं सुचक ट्विट
- हेही वाचा…“तुम्ही शेतकऱ्यांची जात विचारताहेत”? अन् सभागृहात नाना पटोले सरकारवर भडकले