मुंबई : रासायनिक खते घेताना पॉस मशीनवर शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रासायनिक खत खरेदी करताना अगोदर जात विचारली जात आहे. यावरून सभागृहात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाईंट ऑफ व्हीच्या माध्यामातून राज्य सरकारला सवाल केला. त्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा…“गाजर हलवा तरी आम्ही दिला, त्यांनी तर काहीच दिलं नाही”, ठाकरेंची टिका, शिंदेंचा पलटवार
खत घेण्यासाठी शेतकऱ्याची जात विचारली जात असेल तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे. ? तुम्हाला कळायला पाहिजे. शेतकऱ्यांची तुम्ही जात विचारताहेत? असं म्हणत नाना पटोले सभागृहात चांगलेच आक्रमक झालेत. यासंदर्भात केंद्र सरकारने आदेश काढले आहेत. असंही नाना पटोले म्हणाले. त्यावर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावरही नाना पटोले भडकले. त्यानंतर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडवला.
हेही वाचा..सर्वसमावेशक अर्थसंकल्प..! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद, चंद्रकांत पाटील
दरम्यान, सध्या पॉस मशीन ही यंत्रणा केंद्र शासनाच्या खत मंत्रालयामार्फत चालविली जाते. त्यामुळे कृषी विभागात देखील या प्रकाराबाबत काही माहिती नसल्याची सध्या माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जात गोळा करून आणखी कोणत्या नव्या चक्रव्युहात अडकवण्याचा उद्योग तरी सुरू झाला नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
Read also
- हेही वाचा…“तर 2024 ची निवडणुक देशातील शेवटची लोकशाही निवडणुक होईल”, आदित्य ठाकरेंचं सुचकं विधान
- हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
- हेही वाचा..“भरीव तरतूद पण निव्वळ धूळफेक”, छगन भुजबळांंनी साधला सरकारवर निशाणा
- हेही वाचा..““शिंदे सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..!”एकनाथ खडसेंची टिका
- हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा