मुंबई : शिक्षक व पदवीधर मतदारसंघ आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जो झटका बसला, त्यावरून जनता काही आपल्याबरोबर दिसत नाही, अशी शितावरून भाताची परीक्षा घडल्यानंतर, होतं नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढे बघू या हेतूने मांडलेला, वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर
त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येणार आहे. तसेच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवी योजना नमो योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति वर्ष १२ हजार रूपये देण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक विमा सरकार भरणार आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ठेवले मध्यभागी, सरकारकडून मोठ्या योजनांची घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने नमो योजना आणली आहे. या योजनअंतर्गत पीक विम्यासाठी केंद्र सरकारकडून सहा तर राज्य सरकारकडून सहा असे प्रती वर्ष १२ हजार रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर बोलतांना शेतकऱ्यांना ६ हजार रुपये जाहीर केले, एका शेतकऱ्याच्या कुटुंबात ५ माणसे असल्यास, त्यांना दिवसाला ३ रुपये मिळत आहेत, ३ रुपयात चहा तरी मिळतो का? ही काय शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे का? अशा तुटपुंज्या मदतीची शेतकऱ्यांना गरज नाही, त्यापेक्षा त्यांच्या पीकांना चांगला भाव द्या. असा हल्लोबोल अजित पवारांनी राज्य सरकारवर केला.
हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना
अर्थसंकल्पामुळे आमचा भ्रमनिरास झाला, अर्थसंकल्पातून निव्वळ घोषणाबाजी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांची टीकाही केली आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ.. राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्याची हमी, पण भरीव म्हणजे किती याची कोणतीही स्पष्टता नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…“सरकार पडणार हे फडणवीसांना माहिती, त्यामुळे बजेटमध्ये घोषणांचा पाऊस,” आदित्य ठाकरे
- हेही वाचा…“स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, अन् घोषणांचा सुकाळ असा आताचा अर्थसंकल्प” अजित पवारांची प्रतिक्रिया
- अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
- हेही वाचा..राज्यात विविध महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळासाठी 50 कोटींची तरतुद
- हेही वाचा..अर्थसंकल्प..! मुंबईच्या धर्तीवर राज्यात ७०० हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचा निर्णय