मुंबई : आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दुरदृष्टीचा अभाव, वास्तवाचं भान नसेलेला असा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आमचं सरकार असतांना देखील आम्ही अर्थसंकल्प सादर केलेत. परंतु स्वप्नांचे इमले, अन् शब्दांचे फुलोरे, घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला. आज राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना
राज्याची परिस्थीतीनुसार राज्याचं उत्पन्न किती, खर्च किती ? याचा काहीच भान ठेवण्यात आलं नाही. काल महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था वाढवण्याची अपेक्षा होती. तसेच युगपुरूष छत्रपतींच्या नावाने घोषणा देण्याचं काम आतमध्ये चाललं होतं. परंतु पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाचं भूमिपुजन झालं. त्यासंदर्भात काहीही सांगण्यात आलं नाही.
हेही वाचा..“आर्थिक पाहणी अहवालावर रोहित पवारांची सरकार खोचक प्रतिक्रिया”, म्हणाले की,
बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या कानाला बरं वाटावं म्हणून सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच मागच्या सरकारच्या काळात आम्ही विकासाची पंचसुत्री आम्ही मांडली होती, यांनी पंचअमृत आणलं. मुळात अमृत कुणी बघितलेलं नाही. आपण फक्त ऐकत आलो आहे. तसेचं हे विकासाचं पंचमृत आहे. ते कधी पुर्ण होणार नाही. कधी दिसणार नाहीत. फक्त लोकांना स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरवून आणण्याचं काम करत राहायचं. अशी टिका अजित पवारांनी केली.
Read also
- अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
- हेही वाचा..राज्यात विविध महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळासाठी 50 कोटींची तरतुद
- हेही वाचा..अर्थसंकल्प..! मुंबईच्या धर्तीवर राज्यात ७०० हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचा निर्णय
- हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर
- हेही वाचा…शिंदेंच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ठेवले मध्यभागी, सरकारकडून मोठ्या योजनांची घोषणा