मुंबई : आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ता योजना, बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना, धनगर वाड्या- वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना आखण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे ४००० कोटी रूपयांची तरतुद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आज वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.
हेही वाचा..पन्नास खोके अन् नागालॅंड ओक्के, विधानसभेत नागालॅंडचा मुद्दा, सत्ताधारी विरोधक आमनेसामने
शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात वेगवेगळे महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाज, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. रामोशी समाज, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाज पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत संतपण करण्यात येणार असून यासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे.
हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पाच ध्येय ठेवण्यात आलं आहे.त्यात अमृत – शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत- महिला आदिवाशी मागासवर्ग ओबीसी सह सर्व समाज घटकांचा सर्व समावेश विकास. तिसरा अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. चौथे अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम. पाचवे अमृत अमृत पर्यावरण पुरक विकास.
Read also
- हेही वाचा..अर्थसंकल्प..! मुंबईच्या धर्तीवर राज्यात ७०० हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचा निर्णय
- हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर
- हेही वाचा…शिंदेंच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ठेवले मध्यभागी, सरकारकडून मोठ्या योजनांची घोषणा
- हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना
- हेही वाचा..“आर्थिक पाहणी अहवालावर रोहित पवारांची सरकार खोचक प्रतिक्रिया”, म्हणाले की,