मुंबई : राज्याचं अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज्याचं अर्थसंकल्प सादर करीत आहेत. सत्तांतरनंतर शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. नागपुर आणि नाशिक उद्यानासाठी २५० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात योजना पुन्हा सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा..भुजबळांनी शिंदेंना डिवचलं, एकनाथ शिंदेंनी अॅक्शन करत दिलं उत्तर, सभागृहात मोठा गोंधळ
नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे वेळेत व्हावे म्हणून शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून ई पंचनामे करण्यात येणार आहेत. कृषी समिती बाजार समिती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुक्कामासाठी राष्ट्र संत तुकडोजी भवन बांधण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी 3 हजार ३४१ कोटींची तरतुद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना केंद्राकडून ६ तर राज्य सरकारकडून ६ कोटींची तरतुद करण्यात येणार आहे.
हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार
मदत व पुर्वनसर्वसन विभागासाठी 574 कोटी, सहकार विभाग 1 हजार 106 कोटी रूपये, फलोउत्पादन विभागासाठी 648 कोटी, अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी 441 कोटी रूपये अंदाजित आहेत. असंही फडणवीस यांनी सांगितली. त्याचबरोबर मच्छीमारांसाठी २६९ कोटींची तरतुद, शेळी मेंढी पालन योजनेसाठी १० हजार कोटींच्या कर्जाची तरतुद यासाठी महाराष्ट्र शेती व मेंढी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”
त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येणार आहे. तसेच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवी योजना नमो योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति वर्ष १२ हजार रूपये देण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक विमा सरकार भरणार आहे.
Read also
- हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना
- हेही वाचा..“आर्थिक पाहणी अहवालावर रोहित पवारांची सरकार खोचक प्रतिक्रिया”, म्हणाले की,
- हेही वाचा..पन्नास खोके अन् नागालॅंड ओक्के, विधानसभेत नागालॅंडचा मुद्दा, सत्ताधारी विरोधक आमनेसामने
- हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया
- हेही वाचा…“दाढी अन् मिशा आल्या म्हणजे अक्कल येते, असं काही नाही”