मुंबई : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज विधानभवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसऱ्या बाजूला दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जागा झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली होती.
हेही वाचा..“माझ्या मुलांची नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही माझा संघर्ष,” यशोमती ठाकूर यांच्या भावना अनावर
अत्यंत चुरशीच्या झालेल्या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपने आपली एक जागा गमवली. कसब्यातील भाजपची २८ वर्षाची विजयाची पंरपरा रवींद्र धंगेकर यांनी खंडीत केली. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर तब्बल ११ हजार मतांनी विजय मिळवला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी या पोटनिवडणुकीसाठी प्रयत्न करूनही कसब्याची जागा भाजपकडून गेली. याचा मोठा फटका भाजपला बसला.
हेही वाचा…हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले की, “मी कोणतंही…:”
तर दुसरीकडे चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस बघायला मिळाली. अश्विनी जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे मैदानात उतरले होते. तर या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मताची विभागणी झाल्याने महाविकास आघाडीला याचा फटका बसला.
Read also
- हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”
- हेही वाचा…शरद पवारांनी दिला भाजपला बिनशर्त पाठिंबा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच..असं काही घडलं की..
- हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार
- हेही वाचा..“राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने बाजी मारली, अवघ्या एका मताने सत्ता खेचून आणली”
- हेही वाचा..“त्यांच्या घरी चाळीस- पन्नास नाही, तर हजारो खोके जातात,” संजय गायकवाड यांचा आरोप