नवी दिल्ली : अलिकडेच झालेल्या ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. नागालँडमध्ये BJP-NDPP आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. निफियू रिओ हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर नागालॅंडमध्ये पहिल्यांदाच विरोधक नसलेलं सरकार बनणार आहे.
हेही वाचा…“आघाडीने भाजपविरोधात रणशिंग फुंकले, रणनीती ठरली, प्रत्येक जिल्ह्यात सभा”
निवडणुकीनंतर तिसरा सगळ्यात मोठा पक्ष असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूसह सगळ्याच राजकीय पक्षांनी कोणत्याही अटीशिवाय भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये एवढ्या पक्षांना विजय मिळाला आहे. तसंच इतिहासात पहिल्यांदाच नागालँडची विधानसभा विरोधी पक्षाशिवाय अस्तित्वात येईल.
हेही वाचा..बच्चू कडूंना मोठा दिलासा..! 2 वर्षाची शिक्षा, त्यानंतर लगेचच जामीन मंजूर
नागालँडमध्ये विजय मिळवलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी एनडीपीपी-भाजप युती सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 2 मार्चला जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर यश मिळालं. 60 आमदारांची संख्या असलेल्या नागालँड विधानसभेत एनडीपीपी-भाजप युतीला 37 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं.
Read also
- हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार
- हेही वाचा..“राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने बाजी मारली, अवघ्या एका मताने सत्ता खेचून आणली”
- हेही वाचा..“त्यांच्या घरी चाळीस- पन्नास नाही, तर हजारो खोके जातात,” संजय गायकवाड यांचा आरोप
- हेही वाचा..“माझ्या मुलांची नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही माझा संघर्ष,” यशोमती ठाकूर यांच्या भावना अनावर
- हेही वाचा…हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले की, “मी कोणतंही…:”