मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसैनिकांमध्ये चांगलाच रोष दिसून येत असल्याचं विरोधक सांगत आहेत. यातच ठाकरे गटाकडून शिवगर्जना सारख्या अभियानातून बंडखोर आमदारांवर प्रखर टिका करण्यात आली आहे. यातच आता महाविकास आघाडीकडून भाजपविरोधात मोठी रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
आज विधानभवनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थिती होते. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता, त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रत्येक जिल्ह्यांत सभा घेणार आहेत. या सभांमधून भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..““काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
महाविकास आघाडीकडून एप्रिल- मे महिन्यात सभांचा आयोजन करण्यात आलं आहे. याची जबाबदारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पहिली सभा ही छत्रपत संभाजीनगरला होणार आहे. त्यानंतर नागपुर, कोल्हापुर, पुणे, परभणी अशा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.
Read also
- हेही वाचा..बच्चू कडूंना मोठा दिलासा..! 2 वर्षाची शिक्षा, त्यानंतर लगेचच जामीन मंजूर
- हेही वाचा..“जनतेच्या मतांचा बुलडोजर या हुकूमशाही विरोधात आता फिरवावाचं लागेल”, ठाकरेंचा हल्लाबोल
- हेही वाचा..“संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की, आणखी कुठली नशा करतात”?
- हेही वाचा…मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,” उद्या शपथ घेणार