पुणे : सध्या राज्यात ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिंदे गटावर सातत्याने टिका करतांना दिसत आहेत. त्यांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर ही जोरदार पणे देण्यात येत आहे. यातच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांवर जहरी टिका केली आहे.
हेही वाचा..फडणवीसांकडून ठाकरेंसोबतची कुटता संपवण्याचे संकेत, म्हणाले, “आमच्या मित्राला कुणीतरी भांग पाजली”
खासदार संजय राऊत हे शिंदे-फडणवीस सरकारवर टिका करतात कारण संजय राऊत यांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे. त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. ज्या लोकांना आपले ४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाहीत. ज्याप्रमाणे नेते त्यांना सांभाळता आले नाहीत, त्यांना पक्षही सांभाळता आला नाही. राजकारणातील सत्तापिपासून वृत्तीमुळे आणि मुख्यमंत्री पदासाठी आपले ज्यांनी विचार सोडले आणि काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जाऊन बसले ते देश काय सांभाळणार आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केलं,” राजु शेट्टीही सरकारवर भडकले
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर विरोधकांनी मोदींच्या विरोधात एकजुठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार बैठकाही होत आहेत. यातच पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत. असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. त्यावर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून टिकात्मक टिप्पणी केली जात आहे.
Read also
- हेही वाचा..” देशात लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही”,प्रणीती शिंदेंचा मोदींवर हल्लाबोल
- हेही वाचा…” मग इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का ?” खैरेंचा संजय शिरसाट यांना खोचक सवाल
- हेही वाचा…“विरोधकांना माफ करणं हाच आमचा बदला, ” फडणवीसांकडून सुचक विधान
- हेही वाचा..प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही लाभ द्या..! आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला आग्रही मागणी
- हेही वाचा..पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी..! आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना