छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतल्याने एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध केला. यावेळी त्यांनी आंदोलनात कोण बाळासाहेब ठाकरे असं वक्तव्य केलं. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी जलील यांच्यावर जहरी टिका केली आहे.
हेही वाचा…“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात”
इत्मियाज जलील हे हैदराबादचे असल्यामुळे बाळासाहेब कोण हे कळले नसेल. बाळासाहेब ठाकरे कोण होते, असं जगात कुणालाही विचारलं असतं तरी कळलं असतं. पण, या निजमांच्या औलादीला दुसरं काही दिसत नाही. जलील यांनी बाळासाहेबांच्या बद्दल बोलता कामा नये. ते आमचे दैवत आहेत. विरोधात शब्द वापरला तर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाचा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. तीच री ओढत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी निवडून आले. मोदींचं नाव सुचवणारेही बाळासाहेबच आहेत. मात्र, आमच्या काही लोकांना कळत नाही, तो भाग वेगळा असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.
हेही वाचा..“अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकर ९ तारखेला घेणार आमदारकीची शपथ”
दरम्यान, संजय शिरसाठ यांच्यावर ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी निशाणा साधला आहे. स्वत:ला बाळासाहेबांचे वारसदार म्हणता. तो एक हरामखोर येतो. बाळासाहेबांबद्दल काहीतरी बोलतो, तुम्ही उत्तर देत नाही. संभाजीनगर नामांतर झाला त्याचा तुम्हाला आनंद नाही. औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा म्हटलं तर तुम्ही त्याला पाठिंबा देणार नाही का. मग काय करणार. इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का असा सवालही त्यांनी केला.
Read also
- हेही वाचा…“विरोधकांना माफ करणं हाच आमचा बदला, ” फडणवीसांकडून सुचक विधान
- हेही वाचा..प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही लाभ द्या..! आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला आग्रही मागणी
- हेही वाचा..पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी..! आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना
- हेही वाचा..फडणवीसांकडून ठाकरेंसोबतची कुटता संपवण्याचे संकेत, म्हणाले, “आमच्या मित्राला कुणीतरी भांग पाजली”
- हेही वाचा…“चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केलं,” राजु शेट्टीही सरकारवर भडकले