मुंबई : मागच्या वेळी होळीला आमच्या मित्राला खोटं सांगून कुणीतरी भांग पाजून दिली होती. दिवसभर त्यांचं सगळं सुरू होतं. कुणी रडत होतं. कुणी पाहत होतं. हे पाहून मजा आली पण अशा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा करावा. कर्माचा नशा करावा. असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यातली कटुता संपवण्याचा सुचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा..“अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकर ९ तारखेला घेणार आमदारकीची शपथ”
आज संपुर्ण राज्यात धुलिवंदन साजरा केला जात आहे. राज्यातील प्रमुख नेते आपापल्या घरी, कुटुंबीयांसोबत रंग उधळून आनंद साजरा करीत आहेत. याच वेळी फडणवीसांनी यावर भाष्य केलं आहे. विधानभवनात उभं राहुन विरोधकांना बदला घेणार असल्याचं सांगितलं होतं. आज मी त्यांना माफ करून बदला घेतला आहे. असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा..“सरकारने शेतकऱ्याला नुकसानाची भरपाई दिली नाही तर..” अमोल मिटकरींचा कडक इशारा
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारला. त्याआधी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीत लढली. परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करत सरकारमध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. परंतु शिंदेंच्या बंडाळीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत.
Read also
- हेही वाचा..प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही लाभ द्या..! आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला आग्रही मागणी
- हेही वाचा..पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी..! आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना
- हेही वाचा..फडणवीसांकडून ठाकरेंसोबतची कुटता संपवण्याचे संकेत, म्हणाले, “आमच्या मित्राला कुणीतरी भांग पाजली”
- हेही वाचा…“चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केलं,” राजु शेट्टीही सरकारवर भडकले
- हेही वाचा…“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात”