मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे आज संपुर्ण राज्यात धुलिवंदन साजरा केला जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी दु:खात तर नेते मात्र आनंदात धुलिवंदन साजरा करतांना दिसत आहेत. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे.
हेही वाचा…“तो हल्ला राजकीय नाही तर..” आमदार डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणातील आली मोठी माहिती
पहिले दोन दिवस सभाग्रहात शेतक-यांच्या विषयावर चर्चा झाल्या पण “चोरमंडळ “ या एका शब्दाने शेतक-याला विधीमंडळातूनच गायब केले. सत्ताधारी व विरोधी पक्षातील शेतक-यांचे कैवारी म्हणून बिरूदावली लावणा-यांनी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विधानसभेत या गोष्टीवर आवाज उठवावा. आतातरी सत्ताधारी व विरोधी पक्षातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून बिरुदावली लावणाऱ्यांनी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी उद्या तरी विधानसभेत या गोष्टीवर आवाज उठवावा. अशी मागणी राजू शेट्टी यांनी विरोधकांकडे केली आहे.
हेही वाचा..“मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक”, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यातील ज्वारी, द्राक्ष, मक्का, केळी, पपई, गहू, हरभरा, तूर, कांदा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकविमा कंपन्या या सरकारचे जावई असल्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळेसही ते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत. यामुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई संबंधितांना सुचना द्याव्यात. गेल्या आठवड्पासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिले दोन दिवस सभागृहात शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा झाल्या पण चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितले.
पहिले दोन दिवस सभाग्रहात शेतक-यांच्या विषयावर चर्चा झाल्या पण “चोरमंडळ “ या एका शब्दाने शेतक-याला विधीमंडळातूनच गायब केले.
सत्ताधारी व विरोधी पक्षातील शेतक-यांचे कैवारी म्हणून बिरूदावली लावणा-यांनी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विधानसभेत या गोष्टीवर आवाज उठवावा. pic.twitter.com/1hfu7FkZ6B— Raju Shetti (@rajushetti) March 7, 2023
Read also
- हेही वाचा…“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात”
- हेही वाचा..“अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकर ९ तारखेला घेणार आमदारकीची शपथ”
- हेही वाचा..“सरकारने शेतकऱ्याला नुकसानाची भरपाई दिली नाही तर..” अमोल मिटकरींचा कडक इशारा
- हेही वाचा..“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोपडलं, उद्या सभागृहात.. ” अजित पवारांनी राज्य सरकारला दिला इशारा
- हेही वाचा…“३० लाख रूपये द्या, अन्यथा रूपेश मोरेला…, वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, पुण्यात खळबळ”