नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवून दिलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्षे, कांदा पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारची कुंडलीच वाचली,” राणे, कंगना, राणा, सगळंच सांगितलं
हवामान खात्याने अचानकपणे राज्यातील नागरिकांना सतर्केचा इशारा दिला होता. मार्च ६ ते ९ या तारखेदरम्यान राज्यातील अनेक भागांत गारपीठांसह वादळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यात शेतकऱ्यांचा फार मोठं नुकसान होत आहे. अवकाळी पावसाने निफाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. द्राक्षे, हरभरा, कापुस, कांदा ही पीक काढायला आली असता, ती सगळी पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आता हा मुद्द लहुजी कानडे, संग्राम जगताप यांच्यासोबत आम्ही सभागृहात उठवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिला.
हेही वाचा…भाजप आमदाराच्या पुत्राचा मोठा कारनामा..! सकाळीच धाड अन् 6 कोटीची रोकड जप्त
दरम्यान, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कांदांचा भाव घसरल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच आता अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीवरून उद्या विरोधक यावरून आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
Read also
- हेही वाचा…“३० लाख रूपये द्या, अन्यथा रूपेश मोरेला…, वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, पुण्यात खळबळ”
- हेही वाचा…“तो हल्ला राजकीय नाही तर..” आमदार डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणातील आली मोठी माहिती
- हेही वाचा..“मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक”, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- हेही वाचा..“भाजपला चोपायची ‘ही’ संधी मला सोडायची नाही, शरद पवारांची भेट घेऊन..” अमोल मिटकरींनी भाजपला दिला इशारा
- हेही वाचा..“नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..