मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हैरान झाला आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. हाच मुद्दा आज विरोधी पक्षांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माडंला. राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्ताव विधानसभेत मांडला. परंतु सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाल्याने अखेर विरोधकांनी सभात्याग केला.
हेही वाचा..” देशात लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही”,प्रणीती शिंदेंचा मोदींवर हल्लाबोल
मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. हाच मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात मांडला. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. परंतु त्यावर सत्ताधारी पक्षांकडून उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.
हेही वाचा…” मग इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का ?” खैरेंचा संजय शिरसाट यांना खोचक सवाल
राज्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत आम्ही सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. परंतु सरकारने आमचा स्थगन प्रस्ताव नकारल्याने आम्ही सभात्याग केला. यातच काल राज्यात धुळवड साजरी केली जात होती. राज्यातील अनेक नेते धुळवडमध्ये रंग उडवण्यात दंग होते. मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याने त्यांच्या आयुष्याचं बेरंग झाला. अशा शब्दात अजित पवारांनी राज्य सरकारवर जहरी टिका केली.
Read also
- हेही वाचा..“विजयी गुलाल उधळल्यानंतर भेटीगाठी वाढल्या,” धंगेकरांनी खरगेंची घेतली भेट
- हेही वाचा…“स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक”, राज ठाकरे
- हेही वाचा…“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा
- हेही वाचा..भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान
- हेही वाचा..“४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाही, ते देश काय सांभाळणार”?