मुंबई : राज्यात मागील काही दिवसापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. यातच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा..प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही लाभ द्या..! आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला आग्रही मागणी
शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजे. अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. जाहीर करा जाहीर करा. शेतकऱ्यांना भरपाी जाहीर करा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला. बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे, मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अशा घोषणाही यावेळी विरोधकांनी दिल्या.
हेही वाचा..पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी..! आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना
अर्थसंकल्पपीय अधिवेशनाच्या कामकाजाचा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निर्दशने केलीत.
Read also
- हेही वाचा..भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान
- हेही वाचा..“४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाही, ते देश काय सांभाळणार”?
- हेही वाचा..” देशात लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही”,प्रणीती शिंदेंचा मोदींवर हल्लाबोल
- हेही वाचा…” मग इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का ?” खैरेंचा संजय शिरसाट यांना खोचक सवाल
- हेही वाचा…“विरोधकांना माफ करणं हाच आमचा बदला, ” फडणवीसांकडून सुचक विधान