मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध मुद्यांमुळे गाजत आहे. यातच काल विधीमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय राऊत चर्चेत आले होते. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावला आहे. त्यावर संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलं असून आता मंत्री गिरीश महाजन यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक”, राज ठाकरे
महाराष्ट्रातली जनता भांग पिऊन काहीही करत नाही. कारण भांग पिऊन जनता निर्णय घेत असती तर कसब्यात जो निकाल लागला तो लागला नसता. आम्ही कुठली नशा करत असू तर भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याची असंही राऊतांनी स्पष्ट केलं. त्यावर आमच्या मित्रांना भांग पाजली होती मग ते काहीतरी बडबडत राहिले होते. असं फडणवीसांनी म्हटलं.
हेही वाचा…“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा
त्यावर गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की आणखी कुठली नशा करतात हा खरंतर संशोधनाचा विषय आहे. या नशेत ते काहीही बोलू शकतात. संजय राऊतांच्या वक्तव्यांवर रोज रोज काय बोलायचं ना ? आमच्याकडे काहीही शब्द नाहीत. असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा…मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,” उद्या शपथ घेणार
- हेही वाचा..“काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..““काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..“विजयी गुलाल उधळल्यानंतर भेटीगाठी वाढल्या,” धंगेकरांनी खरगेंची घेतली भेट