मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्याआहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरूंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार ? याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
हेही वाचा…“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा
बच्चू कडू यांनी यासंदर्भात नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायालयाने कोर्टाने २०१७ मध्ये केलेल्या आंदोलनासाठी दोन वर्षाची सजा व ५००० रूपये दंड केला आहे. दिव्यांग बांधवाचा ३ वर्षापासून निधी वाटप होत नाही म्हणून संबंधित आयुक्ताला ४ वेळेस पत्र देण्यात आले. दोन वेळेत दिव्यांग बांधवाने आंदोलन देखील केले. असं ट्विट बच्चू कडू यांनी केले आहे.
हेही वाचा..भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान
दरम्यान, 2017 मध्ये बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. महापालिकेत हे आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं.
Read also
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,” उद्या शपथ घेणार
- हेही वाचा..“काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..““काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..“विजयी गुलाल उधळल्यानंतर भेटीगाठी वाढल्या,” धंगेकरांनी खरगेंची घेतली भेट
- हेही वाचा…“स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक”, राज ठाकरे