मुंबई : सत्ताधारी पक्षाचा सत्तापिपासूपणा जनतेच्या लक्षात आला आहे, म्हणून उघड उघड केंद्रीय यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करत आहेत. जनतेच्या मतांचा बुलडोजर या हुकूमशाही विरोधात आता फिरवावाचं लागेल. असा कडक इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टिका केली.
हेही वाचा..“विजयी गुलाल उधळल्यानंतर भेटीगाठी वाढल्या,” धंगेकरांनी खरगेंची घेतली भेट
राज्यातील मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकरी हैरान झाला आहे. त्यावर बोलतांना ठाकरे म्हणाले की, “जनतेच्या हिताचे प्रश्न हे ऐरणीवर येऊ दिले जात नाही, ते ज्या क्षणाला येत आहेत असे वाटते, त्यावेळी वाद निर्माण करून संभ्रम पसरवला जातो, जेणेकरून जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न टाळले जातात.”
हेही वाचा…“स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक”, राज ठाकरे
कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आता सर्वसामान्य माणसांनी खांद्यावर घेणं गरजेचं आहे. कसब्याच्या निवडणुकीने एक दाखवून दिलं की, विरोधक जर एकजिनसीपणाने एकत्रित झाले तर आपण जिंकू शकतो. अशी आशाही ठाकरेंनी व्यक्त करून दाखविली.
Read also
- हेही वाचा..“संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की, आणखी कुठली नशा करतात”?
- हेही वाचा…मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?
- हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,” उद्या शपथ घेणार
- हेही वाचा..“काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..““काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”