मुंबई : राज्याचं अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. त्याआधी सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला. अवकाळी पावसाने झालेल्या शेतीचं लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर करा. अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तो फेटाळून लावला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच खडाजंगी बघायला मिळाली.
हेही वाचा..“त्यांच्या घरी चाळीस- पन्नास नाही, तर हजारो खोके जातात,” संजय गायकवाड यांचा आरोप
त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील हाच मुद्दा मांडला. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ह्या मुद्यावर बोलण्यास नकार दिल्याने विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी दिली. त्यानंतर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्यासाठी उभं राहिलेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले. तसेच लवकरच लवकर शेतकऱ्यांच्या पिकांचं पंचनामे करून त्यांना मदत करण्यात येईल. अशी ग्वाही शिंदेंंनी दिली.
हेही वाचा..“माझ्या मुलांची नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही माझा संघर्ष,” यशोमती ठाकूर यांच्या भावना अनावर
त्यावर अजित पवारांनी शिंदेंवर पलटवार करत सरकारने अजूनपर्यंत काहीच न केल्याचं सांगितलं. कांद्याची खरेदी, हरभऱ्याची खरेदी, नाफेडची खरेदी यांनी आश्वासन दिल्यानंतरही सुरू करण्यात आलेली नसल्याची बाब अजित पवारांनी सभागृहाच्या निर्दशनात आणून दिली. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला.
हेही वाचा…हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले की, “मी कोणतंही…:”
दरम्यान, नाफेडची खरेदी सुरू झाली आहे. असं म्हटल्यानंतर छगन भुजबळ यांनी शिंदेंना डिवचलं. तुम्ही दयाळू आहात. तुम्ही काहीच केलं नाही. असं छगन भुजबळ म्हणाले. त्यावर म्हणून तर १२ हजार कोटी दिलेत. आम्ही देणार आहोत. तुमच्यासारखी तोंडाला पानं नाही पुसलीत आम्ही. असं म्हटल्यानंतर शिंदे आक्रमक झालेत. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना मदत केल्याचं म्हणत शिंदेंनी भुजबळांवर पलटवार केला.
Read also
- हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार
- हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”
- हेही वाचा…शरद पवारांनी दिला भाजपला बिनशर्त पाठिंबा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच..असं काही घडलं की..
- हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार
- हेही वाचा..“राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने बाजी मारली, अवघ्या एका मताने सत्ता खेचून आणली”