मुंबई : कसबा पेठ पोटनिवडणुकीतील नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज विधानभवनात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शपथ दिली. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांला हात घातला. त्याचबरोबर चिंचवडच्या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांनीही आज शपथ घेतली.
हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार
मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून माझी ही नववी निवडणुक होती. 2009 ला देखील विधानसभा निवडणुक लढविली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढाईत माझा अगदी थोड्या मतांना माझा पराभाव झाला होता. परंतु माझ्या कामावर विश्वास ठेऊन मी काम करत राहिलो. त्याच्यामुळेच मला जनतेने सभागृहात पाठवलं आहे. अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली.
हेही वाचा..“राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने बाजी मारली, अवघ्या एका मताने सत्ता खेचून आणली”
मुंबईत आल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, राज ठाकरे अतिशय दिलदार मनाचा राजा आहे. त्याचबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शरद पवार यांच्याही गाठीभेटी घेतल्या.
Read also
- हेही वाचा…“दाढी अन् मिशा आल्या म्हणजे अक्कल येते, असं काही नाही”
- हेही वाचा..भुजबळांनी शिंदेंना डिवचलं, एकनाथ शिंदेंनी अॅक्शन करत दिलं उत्तर, सभागृहात मोठा गोंधळ
- हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार
- हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”
- हेही वाचा…शरद पवारांनी दिला भाजपला बिनशर्त पाठिंबा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच..असं काही घडलं की..