मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतरचा शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात पंचमृत गोष्टींचा उल्लेख केला. त्याचबरोबर अनेक योजनांच्याही घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अर्थसंकल्पावर जहरी टिका करण्यात येत आहे.
हेही वाचा…“सरकार पडणार हे फडणवीसांना माहिती, त्यामुळे बजेटमध्ये घोषणांचा पाऊस,” आदित्य ठाकरे
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. मात्र आपल्यावर टीका होऊ नये यासाठी पंचामृत या नावाने अर्थसंकल्प पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारकडून झाला आहे. १४ मार्चला लागणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात जाईल असा अंदाज या सरकारला आला असावा त्यामुळे जेवढी घोषणाबाजी करता येईल तेवढी करून घ्यावी, असे सरकारला वाटत असावे. असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
हेही वाचा…“स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, अन् घोषणांचा सुकाळ असा आताचा अर्थसंकल्प” अजित पवारांची प्रतिक्रिया
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जो झटका बसला, त्यावरून जनता काही आपल्याबरोबर दिसत नाही, अशी शितावरून भाताची परीक्षा घडल्यानंतर, होतं नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढे बघू या हेतूने मांडलेला दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका त्यांनी केली. लबाडाघरचं आवताण जेवल्याशिवाय खरे नसते. सरकारने सत्तेत आल्यापासून पंचाहत्तर हजार नोकरभरती करणार असल्याची घोषणा केली, तीच घोषणा आजही केली, बेरोजगारीबद्दल काय करणार, उद्योगाबद्दल काय करणार यावर काहीही सभागृहात बोलण्यात आलेले नाही, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, तरीदेखील आम्ही मदत केली असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते. यातून जनतेची दिशाभूल करण्याचे कामच सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.
हेही वाचा..अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
दरम्यान, राजकीय अस्वस्थता अनुभवलेल्या या सरकारने अर्थ नसलेला अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या राज्यातील राजकीय परिस्थिती आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सरकारची झलक अर्थसंकल्पातून दिसली. अशी टिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर वास्तवता काय आहे? सद्द आर्थिक स्थिती काय आहे? याचा विचार न करता केवळ घोषणा करणारा अर्थसंकल्प आहे. कोणतीही दुरदृष्टी नसलेला, स्वप्नांचे इमले बांधणारा, तरतुदीसाठी पैसा कुठून येणार? याची स्पष्ट मांडणी न करणारा अर्थसंकल्प आहे. सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..! अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.
Read also
- हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा
- हेही वाचा…“गाजर हलवा तरी आम्ही दिला, त्यांनी तर काहीच दिलं नाही”, ठाकरेंची टिका, शिंदेंचा पलटवार
- हेही वाचा..सर्वसमावेशक अर्थसंकल्प..! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा..“जनार्धन यांच्यासोबत नाही, म्हणून त्यांना अमृतांची आठवण यायला लागली”, मुंडेंनी फडणवीसांना डिवचलं
- हेही वाचा..“३ रुपयात चहा तरी मिळतो का?” अजित पवारांनी गणित मांडत सरकारवर केला हल्लाबोल