मुंबई : राज्यातील सर्व समाजातील लोकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस जसा झाला. तसा मुंबईत गडगडात झाला. गडगडात झाला, पण पाऊस काही झाला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प गर्जेल तो बरसेल काय ? असा आहे. तसेच एका वाक्यात त्याचं वर्णन गाजर हलवा अर्थसंकल्प. अशी खोचक प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर सरकारवर आपने देखील तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, अन् घोषणांचा सुकाळ असा आताचा अर्थसंकल्प” अजित पवारांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे मोठ-मोठया घोषणांचा अवकाळी पाऊस आहे अशी प्रतिक्रिया आपचे पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे. अवकाळी पाऊसाचा फायदा कमी आणि तोटाच अधिक असतो. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि घोषणा मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कुठल्या प्रकारची तरतूद या अर्थसंकल्प मध्ये नाही. पिंपरी चिंचवड शहरामध्ये २०१७ नंतर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अजून एकाही लाभार्थ्याला घराचा ताबा भेटला नाही परंतु महाराष्ट्र साठी आज आणखी 4 नवीन लाख घरांची घोषणा केली आहे.
हेही वाचा..अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संकल्पनेतून दिल्ली आणि पंजाब मध्ये सुरु केलेले मोहल्ला क्लिनिक च्या धर्तीवर आपला दवाखाना
राज्यात सुरु करण्याची आणि महिलांना बस प्रवासा मध्ये 50% सूट देण्याची घोषणा केली आहे. दिल्ली मॉडेलची कॉपी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा…“गाजर हलवा तरी आम्ही दिला, त्यांनी तर काहीच दिलं नाही”, ठाकरेंची टिका, शिंदेंचा पलटवार
- हेही वाचा..सर्वसमावेशक अर्थसंकल्प..! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा..“जनार्धन यांच्यासोबत नाही, म्हणून त्यांना अमृतांची आठवण यायला लागली”, मुंडेंनी फडणवीसांना डिवचलं
- हेही वाचा..“३ रुपयात चहा तरी मिळतो का?” अजित पवारांनी गणित मांडत सरकारवर केला हल्लाबोल
- हेही वाचा…“सरकार पडणार हे फडणवीसांना माहिती, त्यामुळे बजेटमध्ये घोषणांचा पाऊस,” आदित्य ठाकरे