मुंबई : आजचा अर्थसंकल्प म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने अशा सिरियल सारखा आहे. हा अर्थसंकल्प वास्तवात येऊच शकत नाही. सरकार येऊन आठ महिन्यात अनेक निवडणुका भाजप आणि शिंदे गट हारतेय. हे पाहून त्यांच्या पायाखालची वाळू हलली असून त्यामुळे हा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याचा जनाधर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या घोषणा करण्यात आल्या त्या पुर्ण होऊच शकत नाही. असा टोला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
हेही वाचा..अर्थसंकल्प..! मुंबईच्या धर्तीवर राज्यात ७०० हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचा निर्णय
राज्यात सध्या असंघटित कामगार करीत आहे. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे उसतोड महामंडळाचा पुर्णपणे विसर पडला. नवीन सहा ते सात महामंडळे जाहीर केलीत. परंतु प्रत्येक महामंडळाला ५० कोटीपेक्षा जास्त रूपये दिले नाहीत. त्यामुळे जे काही अर्थसंकल्पात मांडण्यात आलं आहे. ते सर्व मुंगेरीलाल च्या हसीन सपने सारख आहे. हा अर्थसंकल्प वास्तवात येईल असं कुणालाही वाटत नाही. असंही मुंडे म्हणाले.
हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर
गोपीनाथ शेतकरी विमा अपघात योजनेत आम्हाला अपेक्षा होती की, पहिले दोन लाख विमा मिळायची. ती आता सानुग्राहमधून दिलं जातंय. जखमी झालेल्यांना पाच लाख, आणि मरण पावलेल्यांना दहा लाख रूपये देण्यात यावे, अशी आमची मागणी होती. परंतु याच्यातही मनाचा मोठेपणा यामध्ये दाखवण्यात आलेला नाही. आजचा अर्थसंकल्प पंचमृत वाटत असला. तरी कुठेतरी ह्या सरकारमध्ये पुर्णपणे जनार्धनाचं विष कालवण्यात आलेलं आहे. जनार्धन यांच्यासोबत नाही. म्हणून त्यांना अमृतांची आठवण यायला लागली आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
Read also
- हेही वाचा..“३ रुपयात चहा तरी मिळतो का?” अजित पवारांनी गणित मांडत सरकारवर केला हल्लाबोल
- हेही वाचा…“सरकार पडणार हे फडणवीसांना माहिती, त्यामुळे बजेटमध्ये घोषणांचा पाऊस,” आदित्य ठाकरे
- हेही वाचा…“स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, अन् घोषणांचा सुकाळ असा आताचा अर्थसंकल्प” अजित पवारांची प्रतिक्रिया
- अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
- हेही वाचा..राज्यात विविध महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळासाठी 50 कोटींची तरतुद