मुंबई : राज्यातील सर्व समाजातील लोकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस जसा झाला. तसा मुंबईत गडगडात झाला. गडगडात झाला, पण पाऊस काही झाला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प गर्जेल तो बरसेल काय ? असा आहे. तसेच एका वाक्यात त्याचं वर्णन गाजर हलवा अर्थसंकल्प. अशी खोचक प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आज वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा..अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
आताच्या अर्थसंकल्पातील बऱ्याच्या योजना आम्ही केलेल्या योजनांचा नामांतरण करून त्यांनी पुढे मांडलेल्या आहेत. अशी टिका ठाकरे यांनी केली आहे. त्यावर गाजर हलवा तरी आम्ही देतो, त्यांनी तर काहीच दिलं नाही. असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केला. त्यांनीच स्वत:च खाल्लं, दुसऱ्यांना दिलं नाही. असा टोमणाही हाणला.
हेही वाचा..राज्यात विविध महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळासाठी 50 कोटींची तरतुद
आजचा अर्थसंकल्प म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने अशा सिरियल सारखा आहे. हा अर्थसंकल्प वास्तवात येऊच शकत नाही. सरकार येऊन आठ महिन्यात अनेक निवडणुका भाजप आणि शिंदे गट हारतेय. हे पाहून त्यांच्या पायाखालची वाळू हलली असून त्यामुळे हा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याचा जनाधर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या घोषणा करण्यात आल्या त्या पुर्ण होऊच शकत नाही. असा टोला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
Read also
- हेही वाचा..सर्वसमावेशक अर्थसंकल्प..! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा..“जनार्धन यांच्यासोबत नाही, म्हणून त्यांना अमृतांची आठवण यायला लागली”, मुंडेंनी फडणवीसांना डिवचलं
- हेही वाचा..“३ रुपयात चहा तरी मिळतो का?” अजित पवारांनी गणित मांडत सरकारवर केला हल्लाबोल
- हेही वाचा…“सरकार पडणार हे फडणवीसांना माहिती, त्यामुळे बजेटमध्ये घोषणांचा पाऊस,” आदित्य ठाकरे
- हेही वाचा…“स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, अन् घोषणांचा सुकाळ असा आताचा अर्थसंकल्प” अजित पवारांची प्रतिक्रिया