मुंबई : कथित साई रिसोर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळीच ईडीचं पथक सदानंद घरी यांच्या घरी पोहचलं अन् त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात आहे. त्यामुळे अनिल परब यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता युवानेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..““शिंदे सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..!”एकनाथ खडसेंची टिका
सध्या राज्यात सरकारविरोधात किंवा चुकीचं घडतं याबद्दल जो कुणी बोलत आहे. त्याच्यावर ईडी कारवाई करीत आहे. परंतु आमच्या मनात कसलीही भिती नसून ती भिती सरकारच्या मनात आहे. आम्ही सध्या इन्सांफ के सिपाई म्हणून लढत आहोत. आज हा विचार संपुर्ण देशभरात हा विषय मोठा होत चाललेला आहे. आपल्या देशात स्वांतत्रता आणि लोकशाही जिवंत आहे का ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. तसेच कदाचित 2024 ची निवडणुक लोकशाहीसाठी घातक ठरली तर ही निवडणुक देशातील शेवटची लोकशाही निवडणुक होईल. असं सगळ्यांना वाटतं. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा
अलिकडेच उद्धव ठाकरे आणि देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात पत्र लिहिलं होतं. ज्यांच्यावर आरोप झालेत. ते पळाले, आता त्यांचे आरोप सर्व बाजूला ठेवले आहेत. अन् जे आमच्यासोबत आहेत. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे. देशातील लोकशाही टिकते की नाही. इथंपर्यंत विषय पोहचला आहे. अशी टिकाही त्यांनी केली.
Read also
- हेही वाचा..“डोक्यावर भोपळे घेत विरोधकांचं अनोखं आंदोलन”, घोषणांनी परिसर दणाणला
- हेही वाचा…“माझ्या मुलाचं ‘र क्त’ वाहू देणार नाही “, संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरे आक्रमक
- हेही वाचा…साई रिसोर्ट प्रकरणी सदानंद कदम ईडीने ताब्यात, अनिल परबांना झटका, विरोधकांची भाजपवर टिका
- हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
- हेही वाचा..“भरीव तरतूद पण निव्वळ धूळफेक”, छगन भुजबळांंनी साधला सरकारवर निशाणा