मुंबई : माझ्या मुलाचं रक्त वाहू देणार नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लेखोरांना कडक इशारा दिला. अलिकडेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मार्निंग वॉकला शिवाजी पार्कवर गेले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. त्यावर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु काल त्यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे.
हेही वाचा…“गाजर हलवा तरी आम्ही दिला, त्यांनी तर काहीच दिलं नाही”, ठाकरेंची टिका, शिंदेंचा पलटवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल १७ वा वर्धापनदिन ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. याच सोहळ्यात त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाष्य करत आक्रमक भुमिका घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत अनेक मुद्दे उपस्थित केलेत. तसेच भाजपवरही त्यांनी सुचक विधान केलं.
हेही वाचा..सर्वसमावेशक अर्थसंकल्प..! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद, चंद्रकांत पाटील
राज ठाकरे म्हणाले की, ज्यादिवशी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला, त्यादिवशी मला अनेकांनी विचारलं, तुम्हाला यावर काय म्हणायचं? कुणी हल्ला केला असेल? तुमचा कुणावर संशय आहे? त्यावर मी त्यांना एवढंच सांगेन, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल, मग सगळ्यांना कळेल. माझ्या मुलांचं रक्त मी वाया जाऊ देणार नाही. कारण हे महाराष्ट्राची सेवा करतायेत असं राज ठाकरेंनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…साई रिसोर्ट प्रकरणी सदानंद कदम ईडीने ताब्यात, अनिल परबांना झटका, विरोधकांची भाजपवर टिका
- हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
- हेही वाचा..“भरीव तरतूद पण निव्वळ धूळफेक”, छगन भुजबळांंनी साधला सरकारवर निशाणा
- हेही वाचा..““शिंदे सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..!”एकनाथ खडसेंची टिका
- हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा