पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 5 सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करणे हा भाजपचा दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते ठाण्यात बोलत होते. तसेच बारामती आमचं लक्ष्य नसून संपुर्ण महाराष्ट्रा लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
“शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
राज्यात शरद पवारांनी खुप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. पण कधी 60 च्या ( 60 विधानसभा ) वर गेले नाहीत. आजपर्यंत त्यांचं राजकारण पाहिलं तर ते जेव्हा केव्हा सत्तेत आले. तेव्हा कुणालातरी तोडून, संपवून आले आहेत. असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.
“कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”
युतीबाबत मनसे -भाजप आमचे दिल्लीतील आणि राज्यातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे. त्यांना अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत संधी होती महाराष्ट्रा फिरण्याची. करोना काळात लोक मरत असताना ते फिरू शकले असते. पण ते नाही फिरले. आता ते फिरत आहेत. पण महाराष्ट्राची जनता त्यांना विचारणार आहे की अडीच वर्ष तुम्ही कुठे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचं लक्ष्य आता बारामती, भाजप प्रदेशाध्यक्ष 5 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 6 सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. चंद्रशेखर वावनकुळे यांच्यासह या दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील राहुल कुल, बाळासाहेब गावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. बावनकुळे हे 5 सप्टेंबर रोजी बारामती मुक्कामास येणार असून 6 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यत तब्बल 12 तास ते बारामती शहर व बारामती तालुक्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.
Read also
- “गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
- “आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- “दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”
- सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही…; राष्ट्रवादीने बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं
- “भविष्यात रूपाली ताई तुमचं सुद्धा चांगलं होऊ द्या ओक्के”; शहाजी बापू पाटलांचा टोला