मुंबई : महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयांवरील आंदोलने हातात घेऊन आपण लढायला हवे. एप्रिल २०२२ ला महागाई ७.७९% इतकी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई, बेकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. सरकारी नोकर म्हणून तरुण-तरुणींची काम करण्याची इच्छा आहे. परंतु, सरकार आता नोकर नेमण्याऐवजी कायम स्वरूपीचे कंत्राटी कामगार नेमायची भाषा बोलत आहे, याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांवर अन्याय करायचे सरकारने ठरवलेले आहे. यासाठी येणाऱ्या काळात आपण सर्वांनी खंबीरपणे काम कसे केले पाहिजे, यासाठी पक्ष बांधणी महत्त्वाची आहे. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत केलं आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार
जयंत पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा करिष्मा, साहेबांची ताकद, जनतेच्या मनातले त्यांचे आदराचे स्थान हे तुमचं आणि आमचं भांडवल आहे. जी मते देणारी माणसे आहेत त्यांच्या मनात शरद पवार आहेत, त्यामुळे शरद पवार साहेब जिथे उभे राहतील तेथेच पक्ष असेल.असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,..
दरम्यान, आज दुर्दैवाने इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देश पुढे असेल पण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरने माणसाच्या आयुष्यात बदल होत नाही. एक मोठा समृद्धी महामार्ग झाला परंतु प्रॉफिट पेक्षा नुकसानच जास्त झालेले आहे. तेथील गावे आणि छोटे- छोटे दुकानदार यांचे महत्त्व आज कमी झालेले आहे. बऱ्याच जणांचा वेळ वाचत असेल, परंतु त्या समृद्धी महामार्गाने आपल्या मराठी माणसाच्या आयुष्यात बदल झाला याचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही. पुण्यातल्या अनेक लोकांना मेट्रो पाहिजे, परंतु माझा मेट्रोला विरोध नाही पण मी त्यांच्या जागी असते तर, हजारो करोडो रुपये मेट्रोवर घालवले नसते, पहिले सर्व पीएमपी बसेस, एसटी महामंडळ हे सर्व नीट करून मगच मेट्रोमध्ये पैसा गुंतवला असता. रोटी, सब्जी, दाल चावल आधी की मोदक आधी ? मेट्रोचे पैसे हे एसटीमध्ये टाकले असते, तर महिलांना ५०% सूटचा फायदा प्रत्येक महिलेला झाला असता. असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…ललित पाटीलसाठी रूग्णालयात महिला कोण पाठवायचा ? धंगेकरांनी आणखी एक बॉ’म्ब टाकला
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?
हेही वाचा…नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, शिंदे गटाला मोठा धक्का बसणार ?