मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कराभार स्विकारल्यापासून सहा वेळा दिल्ली दौरा केलेला आहे. मंत्रिमंडळाचा अजुन विस्तार झालेला नाही. यामुळे विरोधी पक्षाकडून शिंदे सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
“काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आनंद आहे. आता दोघात तिसरा अशी काहीतरी गुड न्यूज येऊ द्या, नाहीतर कटकरस्थानाने मिळालेली सत्ता फार काळ टिकत नाही आणि पचवता ही येत नाही. असो. एक दुजे के लिये असं ट्विट करत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे.
नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाऊन सल्ला घ्यावा लागतो यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. कुठे घेऊन चाललात महाराष्ट्र माझा असंही शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचं विसरलो, अशी शिंदे गटाची अवस्था झाल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पुढचा एक आठवडा वाट पहावी लागणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही शासकीय कामांसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी बैठक घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तारावर अंतिम चर्चा होणार आहे. सोमवारी मंत्रिमंडळआचा विस्ताराबाबत घोषणा करण्यात येईल अशीही चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आनंद आहे आता दोघात तिसरा अशी काहीतरी गुड न्यूज येऊ द्या नाहीतर कपटकरस्थानाने मिळालेली सत्ता फार काळ टिकत नाही आणि पचवता ही येत नाही. असो.#एकदुजेकेलिये@OfficeofUT @AUThackeray @TV9Marathi
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 6, 2022
छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाऊन सल्ला घ्यावा लागतो यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. कुठे घेऊन चाललात महाराष्ट्र माझा. @TV9Marathi @abpmajhatv @news_lokshahi @SaamanaOnline
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 6, 2022
Read also
- “यांच्या हातात काहीच नाही, जेव्हा दिल्लीतून सिग्लन येईल, तेव्हाच काहीतरी होईल”
- 6 शिवसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; उदय सामंत हल्ला प्रकरण भोवलं
- “हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
- “अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”
- “मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”