मुंबई : भाजपकडून कोणाचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात नाही. ज्यांनी लोकांच्या मेहनतीच्या पैशामध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यांना तर उत्तर द्यावचं लागणार आहे. जर भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणतीही केंद्रीय तपास यंत्रणा काम करीत असेल तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्या इडी चौकशीवर दिलं आहे.
“आगामी महापालिका, ZP व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल”
युतीमध्ये दिलेला शब्द पाळला असता तर ही वेळ आली नसती असं वारंवार सांगितलं जात आहे. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील उद्धव ठाकरे यांना भाजपचाच मुख्यमंत्री राहणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी जाहीर भाषणात पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच राहणार असल्याचं म्हटलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे देखील त्याठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी ते झापले होते का? असा सवाल देखील नवनीत राणा यांनी केला आहे.
पाटलांच लेक राजकारणात होतंय सेट
बिहारमध्ये भाजपकडे जास्त आमदार असताना देखील भाजपने नितेश कुमार यांना मुख्यमंंत्री केलं. तर यामधून आपल्याला लक्षात येईल की, महाराष्ट्रात बईमानी कोणी केली. उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनायचं होतं. तेव्हाच त्यांनी भाजपसोबत युती तोडली. कारण भाजपकडून अशा प्रकराची बोलणीच झालेली नव्हती. तसेच अडीच वर्ष महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं आहे. ते फक्त आता साधेपणाचा आव आणत आहेत. असा हल्लाबोल देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे. शिवसेना नेमकी कुणाची यासंदर्भात सर्वाच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत येत्या 8 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता पुढील राजकीय घडामोडी कशाप्रकारे घडणार तेच पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
- “काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
- नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
- आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
- “राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादीची टोपी सगळीकडे दिसायला हवी”