पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षाच्या सेवादल संघटनेची आढावा बैठक संपन्न झाली. पक्षाचे सेवादल प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के आणि सेवादल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे यांची नियुक्ती झाल्यानंतर ही प्रथम बैठक राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे झाली. यावेळी सेवादलातील दिवंगत नेत्यांना पक्षातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. या आढावा बैठकीला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेवा दल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश मुख्य संघटक संजय रजपूत, महिला संघटक विजयाताई दामले, प्रदेश महिला संघटिका सीमा जाधव, प्रदेश उपाध्यक्ष तस्बीर सिंग तसेच सेवा दलाचे पदाधिकारी व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
“आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकाची उद्धव ठाकरे
ते म्हणाले की, आपल्या सर्वांना सेवादलाचा अनुभव आहे. पक्षाचे सेवादल हे प्रत्येक गावात असले पाहीजे, आरएसएसच्या विरोधात लढण्यासाठी, गावोगावी वैचारिक प्रबोधन करण्यासाठी, सेवादलाच्या झेंड्याखाली नियोजन करायला हवे. एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात विचारमंथन करून सेवादलाचा मोठा फायदा पक्षाला होऊ शकतो, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. राजकारणात दोन विचारधारेचे लोक आहेत, एका प्रकारात सत्ता मिळवून त्यातून पैसा कमवायचा आणि त्यातून पुन्हा पुन्हा निवडून यायचे, असे लोक आहेत. यामुळे देशातील विचारवंत पक्षदेखील भ्रष्ट आहेत का असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. दुसऱ्या प्रकारातील घटकाला अशा चुकीच्या प्रवृत्ती बघवत नाहीत. हा दुसरा विचार क्षीण करायचा नसेल तर विचारांचे मंथन राष्ट्रवादीच्या मंचावर नेहमी व्हायला हवे. यासाठी गावागावात पक्षाचे सेवा दल स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.
“ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील, पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेंच”
पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी सेवा दलाने मनात कोणताही न्यूनगंड आणू नये की सेवा दलाला पक्षातील इतर घटकांपेक्षा कमी समजले जाते. आपल्या पक्षाची विचारधारा ही शाहू-फुले-आंबेडकरांना मानणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येकाला समान महत्त्व आहे. आपला पाया मजबूत केला तर कोणतीही ताकद आपल्याला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे सेवा दलाला पक्ष संघटनेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील प्रत्येक भागात सेवा दलाचे संघटन अधिक बळकट असायला हवे. राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादी टोपी घालून सगळीकडे दिसायला हवी, असे चित्र तयार करण्याचे आवाहन त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केले. तसेच स्थानिक निवडणुकीत आपली निवडून येण्याची तयारी असेल व सेवा दलाकडून काही प्रस्ताव आल्यास त्याचा विचार प्रदेश पातळीवर निश्चित केला जाईल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
“मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”
दरम्यान प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनीही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपण पक्षाचे सेवक आहोत. आपल्यावर दिलेल्या जबाबदारीला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा. पक्षात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. पक्ष संघटना वाढविण्यासाठी आपपल्या क्षमतेप्रमाणे आपण सक्रीय व्हायला हवे. यातून शंभर लोक जरी जोडले गेले तरी हे पक्षासाठी फार मोठे काम आहे असे ते म्हणाले. तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवनियुक्त सेवा दल प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के आणि सेवा दल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पुढे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा दल संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
Read also
- “आगामी महापालिका, ZP व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल”
- पाटलांच लेक राजकारणात होतंय सेट
- इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी
- “अजित पवार माध्यमांशी बोलताना गोंधळले; म्हणाले, मी राज्याचा उप..”
- कावळे संपतील, गायी राहतील..! जे. पी नड्डाजी, जरा जपून..!