मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलिकडेच पत्राचाळ प्रकरणी इडीने अटक केली आहे. त्यांची येत्या 8 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी वाढवण्यात आली आहे. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेचा अंत लवकरच होणार असून देशात फक्त भाजपच शिल्लकर राहणार असल्याचं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर राज्यातील विरोधी पक्षांनी चहुबाजूंनी टिकास्त्र सोडलं. यावर आता सामानात त्यांच्यावर खोचक टिप्पणी करण्यात आली आहे.
“मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे , असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळय़ाच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळय़ाच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही.
“महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”
भाजपच्या मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपविण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे. शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगाने आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही. असं देखील सामनात म्हटलं आहे.
“राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”
दरम्यान, संजय राऊतांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सुरूवातीला त्यांना 4 ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी देण्यात आली होती. मात्र इडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्यानंतर त्यांना आता 8 ऑगस्टपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. तसेच आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील इडीने समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची सोबतच चौकशी होऊ शकते.
Read also
- “आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकाची उद्धव ठाकरे
- “ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील, पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेंच”
- “मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”
- कंगना अन् मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला, मग हा महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय?
- “आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल