कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन होऊन आता महिना उलटला आहे. मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झाला नसल्याने विराधी पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असतानाच शिनसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी मोठे विधान केले आहे.
“राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”
36 वर्षापासुन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले होते. माझ्यासारखा एकनिष्ठ कार्यकर्ताही सोडून जातो म्हणल्यावर विचार होणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेच असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा लवकरच होणार असल्याचे म्हणाले आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, भावनिक नातं कायम राहणार असल्यांचेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यातच आता शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची ही भर पडली आहे.
यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी अन् वनविभागाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी..
महाविकास आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती दिली जात असल्याचा आरोप सातत्याने शिंदे सरकारवर होत आहे. मात्र, दिलेली मंजूरी बरोबर आहे की नाही याबाबत तपासणी होण्यासाठी स्थगिती दिल्याचे राजेश क्षीरसीगर यांनी सांगितले आहे. केवळ शाहू महारादजांच्या समाधी स्थळाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही तर सर्वच कमांबाबत असा निर्णय घण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात 10 मंजूर झाले असतील तर आता लागल्यास 50 कोटींची पूर्तता करू अशी ग्वाही क्षीरसागरांनी दिली आहे. त्यामुळे केवळ शाहू महाराजच नाही तर सर्वच महापुरूषांच्य़ा कामाची पूर्तता केली जाणार आहे. विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण कोल्हापुरकर हे हुशार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा
सलग 36 वर्षे काम करून देखील माझ्यासारख्या कार्यकर्ता हा ठाकरे कुटुंबाला सोडुन जातो यामागे नेमके कारण काय याचा शोध घेणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही, त्यामुळेची ही वेळ आल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे. आपल्या राजकीय कार्यकीर्दमध्ये ठाकरे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यामुुळे आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत पण राजकीय गुरू मात्र एकनाथ शिंदेच असल्याचं क्षीरसागर म्हणाले आहेत.
Read also
- “मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”
- कंगना अन् मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला, मग हा महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय?
- “आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल
- “मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
- “महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”