दिल्ली : राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली आहेत. बीएमसीवर सत्ता मिळवणे हाच भाजपाचा हेतु आहे. एकदा का मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आली की त्यांच्या समोर दुसरं कोणतही मोठं आव्हान नाही. त्यानंतर शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही, हा माझा अंदाज खरा ठरणार आहे, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एमआयएमने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या विषयावर झालेल्या बैठकीला खासदार जलील हजर होते.
यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी अन् वनविभागाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी..
भाजप फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणे, हाच भाजपचा उद्देश आहे. एकदा का मुंबई महापालिकेवर सत्ता मिळाली की ते कोणाला कुठे सोडून देतील हे देखील माहिती पडणार नाही. भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. मुंबई महापालिका भाजपला मिळवायची होती. त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडण लावलीत, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा
राजकीय स्वार्थापोटी शहराचं नामांतर करण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे मुस्लिम जनता नाराज आहे. शहरातील मुस्लिम लोक औरंगजेबाला फॉलो करत नाहीत, पण तो इतिहासाचा एक भाग आहे. तो मिटवता येणार नाही. शहरात काही सुविधा नसताना फक्त श्रेय लाटण्यासाठी नाव बदलण्याचा घाट घातला जातोय, याला जनता उत्तर देणार. यासोबतच औरंगाबादचा पुढचा महापौर एमआयएमचा होणार असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले आहे.
“आमचे शिवसैनिक पळून जाणारे नाहीत, त्यांनी थांबून तुम्हाला ठोकलं असतं”
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्यलर भूमिका स्वीकारतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएम पक्षावर सर्रास भाजपची बी टीम असल्याचं आरोप करतात. मात्र आता मुस्लिमांचा मोठा व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपीसून दूर गेलाय, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठकीला बोलावलं म्हणून मी आलो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही एकत्रीतपणे निर्णय घेतल्याची माहितीही इम्तियाज जलील यांनी दिली.
Read also
- कंगना अन् मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला, मग हा महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय?
- “आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल
- “मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
- “महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”
- “राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”