पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांगर्तत सरकारने घरोघरी तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमांर्गत 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान, घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील विविध नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील तिरंगा म्हणून डिपी ठेवला आहे. मात्र हर घर तिरंगा या योजनेवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.
“राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”
हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन देण्यात आले आहे. या कार्यक्रमातंर्गत ध्वजाचे कापड पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. तिरंगा ध्वजाचे कंत्राट हे रे ऑन कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुरवठदाराने पुरवलेल्या ध्वजाचे कापड ठिकठिकाणी उसवलेले फाटलेले आहे. आकार आयताकृती नसून अशोकचक्र एकाच बाजूला आहे. अशा तक्रारी येत आहेत. यावरून अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी अन् वनविभागाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी..
तिरंगा ध्वजाचे कोट्यावधीचे कंत्राट घेणारी “रेऑन” कंपनी नेमक्या कोणाच्या मालकीची? या माध्यमातुन परत अदानी अंबानी श्रीमंत करण्याचा महोत्सव होत आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच कारण कंगना राणावत व खुद्द मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला मग आजादी का अमृत महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकीकडे आपण जाहीर केला आणि त्याचे कंत्राट ज्या “रे ऑन” कंपनीने घेतल्याच समजतंय त्यांनी पुरवलेले ध्वज ठीकठिकाणी उसवलेले व फाटलेले निघाले. ध्वजाचा आकार आयताकृती नसुन अशोकचक्र एकाच बाजूला आहे. हा राष्ट्रध्वजाचा अपमान नाही का? असंही अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
Read also
- तिरंगा ध्वजाचे कोट्यावधीचे कंत्राट घेणारी “रेऑन” कंपनी नेमक्या कोणाच्या मालकीची? राष्ट्रवादीचा सवाल
- शिंदे गटातील बंडखोर आमदाराच्या पॅनेलचा दणदणीत विजय; 7 पैकी 6 ग्रामपंचायतीवर फडकवला झेंडा
- “आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल
- “मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
- “महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”